Anuradha Vipat
आयुर्वेदानुसार, वेगवेगळ्या धातूंच्या भांड्यांमध्ये साठवलेले पाणी पिण्याने शरीरातील दोष संतुलित राहतात आणि अनेक आजारांवर ते फायदेशीर ठरते.
तुमच्या शारीरिक समस्या किंवा आजारानुसार कोणत्या धातूच्या भांड्यातील पाणी पिणे 'चमत्कारिक' ठरते ते आज आपण पाहूयात.
तांब्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
हे पाणी प्यायल्याने उन्हाळ्यात लू लागण्यापासून बचाव होतो आणि शरीराला नैसर्गिक खनिजे मिळतात.
पितळाच्या भांड्यात साठवलेले पाणी शरीरातील ऊर्जा पातळी टिकवून ठेवते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते
चांदीच्या पेल्यातून किंवा भांड्यातून पाणी प्यायल्याने मेंदू शांत होतो आणि पित्ताचा त्रास कमी होतो.
लोखंडाच्या संपर्कात आल्यामुळे पाण्यात लोहाचे प्रमाण वाढते, जे शरीरातील हिमोग्लोबिन सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.