Mahesh Gaikwad
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशातील प्रत्येक गावाची एक अशी अनोख्या परंपरा आहेत.
देशातील डोंगराळ भागातील गावे ही अशाच आपल्या परंपरांसाठी प्रसिध्द आहेत.
देशात असंच एक गाव आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला केवळ मक्याची कणसंच कणस दिसतील.
गावातील घरांच्या छपरांवर, भींतीवर, दरवाजे आणि खिडक्यांवर तुम्हाला मक्याची कणसं उलटी लटकवलेली दिसतील.
मसुरीच्या सैजी गावाल मक्याच गाव म्हणतात. या गावात प्रत्येक घराच्या बाहेर मका लटकवलेली दिसते.
मका सुकविण्यासाठी आणि पुढील पिकासाठी बियाणे तयार करण्यासाठी मका घराबाहेर लटकवली जाते.
आसपासच्या गावातील लोक या गावाला मक्याच गाव असं म्हणतात.