Anuradha Vipat
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल वापरल्याने आपल्या डोळ्यांवर आणि मेंदूवर प्रचंड ताण पडतो.
आजच्या डिजिटल युगात ही सवय अतिशय सामान्य झाली असली तरी ती शरीराला आतून पोखरत आहे.
मोबाईलच्या स्क्रीनमधून 'ब्लू लाईट'बाहेर पडतो. हा प्रकाश मेंदूला दिवसाचा भास करून देतो. परिणामी गाढ आणि शांत झोप येत नाही.
मोबाईलच्या तीव्र प्रकाशामुळे डोळे कोरडे पडणे , डोळ्यातून पाणी येणे, जळजळ होणे आणि हळूहळू दृष्टी कमकुवत होण्याचा मोठा धोका असतो.
झोपण्यापूर्वी सोशल मीडियावरील पोस्ट यामुळे मन शांत होण्याऐवजी मनात विचारांचे चक्र सुरू होते, ज्यामुळे मानसिक तणाव, चिंता आणि चिडचिड वाढते.
झोप अपुरी झाल्याने रात्रीच्या वेळी अवेळी भूक लागते आणि माणूस जास्त कॅलरी असलेले पदार्थ खातो, ज्यामुळे वजन आणि पोटाची चरबी वेगाने वाढते.
रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने मेंदूला पुरेशी विश्रांती मिळत नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर डोके जड वाटणे आणि स्मरणशक्ती कमकुवत होणे अशा समस्या जाणवू लागतात.