Deepak Bhandigare
हिवाळ्यात मिळणारी हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी पौष्टिक असतेच, त्याचबरोबर ही खाण्यास चविष्ट असते
यात प्रथिने, जीवनसत्त्वे असल्याने ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानली जाते
या भाजीत कार्बोहायड्रेट्स, लोह आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते
या भाजीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळू शकतो
मधुमेहापासून ते त्वचा रोगांसारख्या समस्येवर हरभऱ्याची भाजी खूप फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले जाते
या भाजीत असलेल्या पोषक घटकांमुळे दृष्टी सुधारण्यासाठी मदत होऊ शकते
त्यात कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने शरीराचे वजन नियंत्रणात राहते
या भाजीमध्ये फायबर भरपूर असते, जे अधिक वेळ भूक नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरते