Swarali Pawar
एल निनोमुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणून प्रत्येक थेंब जपणं आणि साठवणं आता खूप महत्त्वाचं आहे.
पावसाचे पाणी जमिनीत झिरपून खाली साठते, त्याला भूजल म्हणतात. हेच पाणी विहीर आणि बोअरवेलमधून वापरलं जातं.
पाण्याचा वापर वाढतोय, पण पुनर्भरण कमी होतंय. यामुळे भूजल पातळी सतत खाली जात आहे.
पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्याची प्रक्रिया म्हणजे पुनर्भरण. यामुळे भविष्यासाठी पाण्याचा साठा तयार होतो.
भूजल वाढल्याने विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी टिकतं. दुष्काळातही पिकांना पाणी उपलब्ध राहते.
पाणी वर आल्याने कमी वीजेत पाणी उपसता येतं. यामुळे सिंचनाचा खर्चही कमी होतो.
भूजल वाढल्याने पाण्याचा खारटपणा कमी होतो. तसंच मातीची धूपही कमी होते.
पावसाचे पाणी साठवणं म्हणजे भविष्यासाठी बचत आहे. हीच “पाण्याची फिक्स्ड डिपॉझिट” दुष्काळात उपयोगी पडते.