Mahesh Gaikwad
शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली.
या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना २-२ हजारांच्या तीन हप्त्यांमध्ये एकूण ६ हजार रुपये थेट खात्यात दिले जातात.
मात्र, योजनेसाठी पात्रता नसतानाही काही लोक योजनेचा फायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
योजनेसाठी पात्र नसतानाही योजनेचा फायदा घेणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
या प्रकरणी उत्तर प्रदेशातील १० लाख शेतकरी चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. केंद्राच्या सुचनेनुसार युपी सरकार या शेतकऱ्यांची चौकशी करत आहे.
जे शेतकरी सरकारी नोकरीत आहेत किंवा आर्थिकदृष्ट्या संपन्न असून आयकर भरतात. असे लोक या योजनेसाठी अपात्र आहेत.