Aslam Abdul Shanedivan
आपला भारत देश हा कधी काळी सोन्याची चिडीया म्हणून ओळखला जात होता. विदेशात अनेक वस्तूंसह मसाले पदार्थांची विक्री केली जात असे.
या मसाल्यांत अनेक पदार्थ असून जायफळ हे भारतातील एक महत्त्वपूर्ण आहे.
याच जायफळच्या माध्यमातून गोव्याला पेंटंट मिळाले असून ते 'जायफळ टॅफी' आविष्काराला मिळाले आहे.
या पेंटंटमुळे शेतकऱ्यांना प्रत्येक झाडामागे ५६०० रुपये वार्षिक उत्पन्न मिळणार आहे
गोव्याच्या भारतीय कृषी संशोधन परिषद - केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्र (ICAR-CCARI) केंद्रातील डॉ. ए.आर. देसाई यांच्या टीमला हे पेटंट मिळालं आहे.
तसेच देसाई यांच्या टीमने तयार केलेल्या पेटंटला ५२८११९ या क्रमांकाने पेटंट देण्यात आळे आहे
जायफळ बीज कोषांचा जास्तीत जास्त वापर करण्याचा उद्देशाने आयसीएआर - सीसीएआरआयचा होता. यातूनच जायफळ टॅफी तयार करण्यात आले. जे १२ महिने साठवता येते