Mahesh Gaikwad
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातला सर्वात मोठा ७ वा क्रमांकाचा देश आहे. भारत देशाचे क्षेत्रफळ ३२० लाख स्केवअर किलोमीटर इतके आहे.
लोकसंख्येच्या दृष्टीनेही भारत जगातील सर्वात मोठा देश आहे. जगातीच्या लोकसंख्येचा विचार करता एकट्या भारताची लोकसंख्या ही १४० कोटींच्या आसपास आहे.
भारत देश एवढा मोठा आहे की, भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्र शासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याची प्रशासन व्यवस्था व्यवस्थित चालावी, यासाठी जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत भारतात ८०० च्या आसपास जिल्हे आहेत. भारतातील काही मोठ्या राज्यांमध्ये ५० हून अधिक तर अनेक राज्यांमध्ये ३० हून अधिक जिल्हे आहेत.
आज आपण भारतातील अशा राज्याबद्दल माहिती पाहणार आहोत. ज्या राज्यात केवळ दोनच जिल्हे आहे. विशेष म्हणजे हे राज्य पर्यटनासाठी जगप्रसिध्द आहे.
या राज्याचे नाव आहे गोवा. गोवा हे राज्य भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९६१ साली भारतात विलीन झाले. गोव्यात केवळ दोनच जिल्हे आहेत.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशी या दोन जिल्ह्यांची नावे आहेत. उत्तर गोव्याचे मुख्यालय पणजी तर दक्षिण गोव्याचे मुख्यालय मडगाव येथे आहे.
गोवा हे पर्यटनासाठी जगप्रसिध्द आहे. देशविदेशातील पर्यटक गोव्यात पर्यटनासाठी येत असतात.