Anuradha Vipat
ज्योतिषशास्त्र आणि पौराणिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाला 'प्रथम पूजनीय' आणि 'विघ्नहर्ता' मानले जाते.
गणपती बाप्पाच्या १०८ नावांचा जप केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील अनेक गंभीर दोष, ग्रहांची पीडा आणि जीवनातील संकटे दूर होतात.
कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल, 'बुध दोष' असेल किंवा तो नीच स्थानी असेल तर गणपतीच्या १०८ नावांचा जप करावा.
जर कुंडलीत राहू-केतूची महादशा किंवा अंतर्दशा सुरू असेल, तर जीवनात अचानक संकटे येतात. बाप्पाच्या नामस्मरणामुळे राहू-केतूचे अशुभ प्रभाव शांत होतात.
भगवान गणेशाचा संबंध लाल रंगाशी आणि पृथ्वी तत्त्वाशी आहे, ज्यामुळे त्यांचा मंगळ ग्रहावर थेट प्रभाव असतो. कुंडलीत 'मंगळ दोष' असल्यामुळे विवाहामध्ये येणारे अडथळे दूर होतात.
गणेश चतुर्थीच्या चंद्राला शापित मानले जाते, परंतु बाप्पाच्या भक्तीने चंद्राची पीडा देखील दूर होते.
कुंडलीत ग्रहांची स्थिती कशीही असो, जर कामात सतत अडथळे येत असतील, तर 'विघ्नराज' आणि 'विनायक' या नावांच्या प्रभावाने ते अडथळे कायमचे नष्ट होतात.