Anuradha Vipat
गणेशोत्सव २०२६ हा केवळ बाप्पाच्या भक्तीचाच नव्हे, तर घरातील नकारात्मक ऊर्जा आणि दारिद्र्य दूर करण्याचा अतिशय पवित्र काळ आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, गणपती बाप्पाला 'विघ्नहर्ता' आणि बुद्धी, समृद्धीचा दाता मानले जाते.
दररोज सकाळी पूजेच्या वेळी गणपती बाप्पाला २१ दुर्वांची जोडी आणि शमीची पाने अर्पण करा. यामुळे कुंडलीतील बुध दोष दूर होऊन व्यवसायात नफा मिळण्यास सुरुवात होते.
गणेशोत्सवाच्या दिवसांत रोज बाप्पाला गूळ आणि गाईच्या शुद्ध तुपाचा नैवेद्य दाखवा. नैवेद्य दाखवल्यानंतर हा प्रसाद गरिबांना किंवा गायीला खाऊ घाला.
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या चरणाजवळ ५ किंवा ११ पिवळ्या कवड्या ठेवा. यामुळे तिजोरी कधीही रिकामी राहत नाही.
गणेशोत्सवाच्या काळात दररोज 'ऋणहर्ता गणेश स्तोत्र' किंवा 'संकष्टनाशन गणेश स्तोत्र' पठण करावे.
गणेशोत्सवाच्या १० दिवसांत रोज संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा.