Aslam Abdul Shanedivan
हा डाळीचा एक प्रकार असून त्यातील विषारी घटकांमुळे लॅथिरिझम नावाचा आजार होऊ शकतो. त्यामुळे १९६१ मध्ये एफएसएसएआयने यावर बंदी घातली.
तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असून ते कर्करोगाला निमंत्रण देते. यामुळे FSSAI ने कोणत्याही खाद्यपदार्थात तंबाखू किंवा निकोटीन टाकण्यास बंदी घातली आहे.
अनुवांशिकरित्या सुधारित पिके आणि खाद्यपदार्थांची लागवड आणि आयात यावर भारताचे कठोर नियम आहेत. यामुळे FSSAI ने त्यांच्यावर बंदी घातली आहे.
काही कृत्रिम गोड पदार्थ आरोग्यास हानी पोहोचवू शकतात, म्हणून FSSAI ने केवळ सुरक्षित असणाऱ्याच कृत्रिम गोड पदार्थांना परवानगी दिली आहे. इतर सर्वांवर निर्बंध आहेत.
ब्रेड आणि इतर बेकरी वस्तूंमध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि आयोडेटचा वापर वापर केला जातो. यांना कर्करोगाचे कारण मानले जातात. त्यामुळे भारतात यावर बंदी आहे.
ट्रान्स फॅटमुळे हृदयरोग आणि इतर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे यावर देखील बंदी आहे
चायनीज दुधात भेसळीसाठी मेलामाईन घातले जाते. जे विषारी रसायन आहे. त्यामुळे यावर देखील बंदी घालण्यात आली आहे.
याशिवाय फळे कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी वापरण्यात येणारे कॅल्शियम कार्बाइड आणि इथिलीन गॅस या रासायनिक घटकांवर देखील भारतात बंदी आहे.