Mahesh Gaikwad
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. पावसाळ्या विविध आजारांचा संसर्ग होतो. सर्दी-खोकला, पोटदुखी, जुलाब यासारखे आजार या दिवसात होतात.
याशिवाय डास चावल्यामुळे डेंग्यू, मलेरिया आणि सध्या झिका सारख्या आजारांचाही धोकाही वाढला आहे.
पावसाळ्या डास चावल्यामुळे डेंग्यू हा विषाणूजन्य आजार होतो. एडिस इजिप्ती प्रजातीचा डास चावल्यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव होतो.
डेंग्यूचा संसर्ग झाल्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. परिणामी रुग्णाला खूप थकवा येतो. अशावेळी काही फळे खाल्ल्याने प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होते.
डेंग्यू झालेल्या व्यक्तीला आहारामध्ये संत्र्याची फळे खायला द्यावी. संत्रा फळामध्ये 'व्हिटामिन-सी'चे प्रमाण भरपूर असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर असतात.
किवी हे फळसुध्दा व्हिटामिन-सी ने भरपूर असते. डेंग्यू झालेल्या रुग्णाला ही फळे खायला दिल्यास लवकर बरे होण्यास मदत होते.
डेंग्यूच्या रुग्णांनी दररोज पपई खाल्ल्याने खूप फायदा होतो. याशिवाय पपईच्या पानांचा रस पिण्याचा सल्लाही दिला जातो.
पपईमध्ये पैपीन नावाचे एन्झाइम असते. जे शरीरातील प्लेटलेट्स वाढविण्यासाठी मदत करते.
डेंग्यूच्या आजारामध्ये शरीरातील प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने कमी होते. त्यामुळे रुग्णाच्या जीविताला धोका होण्याची शक्यता असते.