Aslam Abdul Shanedivan
राज्याच्या सर्वदूर मॉन्सून पसरला असून पावसाला सुरूवात झाली आहे
त्यामुळे त्वचेची ऍलर्जी, डेंग्यू ताप, मलेरिया, फ्लू, गॅस्ट्रो, टायफॉइड, हेपेटायटीस ए आणि डासांमुळे होणार आजार वाढतात
या आजारांपासून स्वत:ची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.
पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. या मोसमात हवेतील आर्द्रतेमुळे रस्त्यावरची घाण आणि बॅक्टेरिया पदार्थांवर साचते. ज्यामुळे अनेक आजार होण्याचा धोका असतो.
रस्त्यावरील खाद्यपदार्थांवर खाल्ल्यास कॉलरा, उलट्या, जुलाब यासह अनेक आजार होण्याचा धोका असतो
पावसाळ्यात अपचन टाळण्यासाठी तळलेले अन्न टाळावे.
पावसाळ्यात तळलेले अन्न खाल्ल्यास पोटदुखी, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होतो. (अधिक माहितीसाठी आहार तज्ज्ञांची मदत घ्यावी. आमचा कोणताच दावा नाही)