Aslam Abdul Shanedivan
गेल्या वर्षी पार पडलेल्या व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून त्यात वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ झाली आहे.
या ३,१६७ वाघांपैकी ४४६ वाघ महाराष्ट्रात आहेत. ही संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत.
मात्र यंदा जानेवारी ते मेपर्यंत १६ वाघांचा मृत्यू झाला आहे. ही बाब चिंताजनक असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मुनगंटीवार यांनी ही माहिती पावसाळी अधिवेशानात विधानसभेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे
तर मागील वर्षी विविध कारणांमुळे एकूण ५१ वाघांचा मृत्यू झाल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले
राज्यात २०१८ ते मे २०२४ या कालावधीत विद्युत प्रवाहामुळे २२ वाघांचा मृत्यू झाला होता.
जानेवारी ते २० मे २०२४ पर्यंतच्या नैसर्गिकरीत्या ८, अपघात २, विद्युत प्रवाह १ आणि अद्याप कारण स्पष्ट नसणारे ५ प्रकरणे असा १६ वाघांचा मृत्यू झाला आहे