Sanjana Hebbalkar
चहाची चव वाढवण्यासाठी चहामध्ये आलं टाकलं जातं. आल्यामुळे अनेक पदार्थाची रुचकरता वाढते.
याचं आल्याचे आरोग्यासाठी बहुगुणी फायदे आहेत. फक्त आलं नव्हे तर आल्याचं पाणी देखील फायदेशीर ठरतं.
आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्याचे पाणी पिल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
दिवसातून दोन वेळा आल्याचं पाणी पिल्यानं पचनाची समस्या दूर होण्यास मदत होते
आल्याच्या पाण्यामुळे पीरियड क्रम्पपासून सुटका होते.
आल्याचं पाणी पिल्याने पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे अतिरिक्त खाणं टाळलं जातं. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
आल्यामध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे केस निरोगी राहतात.