Anuradha Vipat
आंबा चविष्ट असला तरी, आयुर्वेदानुसार आंब्यासोबत त्याचे सेवन केल्यास पचन बिघडू शकते किंवा त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
आंबा आणि दही एकत्र खाल्ल्याने शरीरात 'वात' आणि 'कफ' वाढू शकतो.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारल्याची भाजी खाल्ल्यास मळमळणे, उलट्या होणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
आंबा निसर्गतः गरम असतो. तिखट पदार्थांसोबत तो खाल्ल्यास पोटातील उष्णता वाढून पुरळ किंवा उष्णतेचे फोड येऊ शकतात.
कोल्ड ड्रिंक्समधील साखर आणि आंब्याची साखर एकत्र आल्यास रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटदुखी, गॅस किंवा ॲसिडिटी होऊ शकते. (किमान ३० मिनिटांनी पाणी प्यावे)
आंबा उष्ण असल्याने दिवसाला १-२ आंब्यांपेक्षा जास्त सेवन टाळावे.