Aslam Abdul Shanedivan
अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी अर्थसंकल्प सादर करताना अनेक मोठ्या घोषणा केल्या.
या अर्थसंकल्पात दुर्बल घटकांसाठी देखील विविध घोषणा करण्यात आल्या आहेत
अर्थसंकल्पात दुर्बल घटकांसाठी ‘सर्व स्वरुपातील सार्वत्रिक दारिद्रय नाहीसे करणे’ असे शाश्वत विकास ध्येय ठेवण्यात आला
संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून निराधार, विधवा, दिव्यांग तसेच वृध्द नागरिकांना अर्थसाहाय्यता देण्यात येते
या अर्थसहाय्यातेत वाढ करण्यात आली आहे. या योजनेतून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यातेत वाढ करण्यात आली असून ती आता १००० रावरून १५०० रू करण्यात आली आहे
सन २०२३-२४ मध्ये ४५ लाख ६० हजार लाभार्थींना ७ हजार १४५ कोटी रुपये अनुदान वाटप करण्यात येणार आहे
पान, पानपिंपरी आणि मुसळीचे उत्पादन करणाऱ्या बारी समाजाच्या उन्नतीसाठी संत श्री रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना