Sanjana Hebbalkar
सध्या पावसाची अवस्था सगळीकडे वेगळी आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी दुष्काळ आहे.
गेली अनेक वर्ष ही परिस्थिती निर्माण होतं आहे. त्यामुळे याला पर्याय म्हणून काही राज्यात आणि देशात ड्राय शेतीला महत्त्व दिलं जातं आहे.
ड्राय शेतीमध्ये पिकांना आवश्यकतेनुसान पाणी दिलं जातं. यासाठी सुधारित बियाणांचा वापर केला जातो
या तंत्रामध्ये व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजाबसं ज्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान आणि कमी पाण्यात उगवणारे बियाणे वापरण्यास प्राधान्य दिलं जातं
जमिनीत ओलावा टिकून राहावा यासाठी खोल नांगरणी केली जाते. प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला जातो. पावसाचं पाणी गोळा केलं जातं
वॉटर शेडचा उपयोग केला जातो. तसेच ठिबक सिंचनाचं तंत्र कमी पावसाच्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं ठरतं.
जैविक खतांचा वापर केल्यास उत्पादनात चांगली वाढ होते.