Mahesh Gaikwad
भारतात मोठ्या संख्येने लोक उदर्निवाहासाठी शेती आणि शेती संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहेत.
अलिकडच्या काही काळात शेतीतून मिळणाऱ्या कमी उत्पन्नामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार कल्याणकारी योजनांसह आर्थिक मदतीच्या योजना राबवत आहे.
पीएम किसान मानधन योजना हीही यापैकीच एक योजना आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना पेन्शन मिळते.
या योजनेंतर्गत छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये निवृत्ती वेतन म्हणून दिले जातात.
६० वर्षे वय ओलांडलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. यासाठी शेतकऱ्यांना ५५-२०० रुपये प्रिमियम भरावा लागणार आहे.
तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी १८ ते ४० वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांना नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.