Mahesh Gaikwad
देशातील अनेक भागांमध्ये उन्हाचा चटका असह्य होत आहे. काही ठिकाणी तापनामाचा पारा ४० अंशाच्या पार गेला आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत डिहायड्रेशन, उष्माघात, थकवा जाणवणे यासारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी लोक विविध प्रकराचे ज्यूस किंवा फळांचे सेवन करतात.
उन्हाळ्याच्या दिवसांत कोरफडीचा ज्यूस शरीरासाठी एनर्जी बूस्टरचे काम करतो. याशिवाय कोरफडीमुळे त्वचा चमकदार होण्यासही मदत होते.
या दिवसांत दह्यामध्ये जीरा पावडर आणि हिंग टाकून पिल्यास पोटातील आग पित्ताच्या समस्येपासून आराम मिळतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बेल फळाचा ज्यूस पिणे अत्यंत फायदेशीर असते. यामुळे पोटातील दाह शांत होण्यास मदत होते.
पुदिन्याचा सरबत पिल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि उष्माघातापासून बचाव होतो. यामुळे पोटातील दाहसुध्दा कमी होतो.