Anuradha Vipat
शरीराला त्वरित उष्णता आणि ताकद देण्यासाठी खारीक आणि खजूर हे सर्वोत्तम सुकामेवा मानले जाते.
खारीक स्वभावाने उष्ण असते. यात लोह आणि नैसर्गिक शर्करा भरपूर असल्याने शरीराला तात्काळ ऊर्जा आणि ताकद मिळते.
अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स आणि निरोगी चरबी असते, जी शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करते.
हिवाळ्यात किंवा अशक्तपणा जाणवताना बदाम खाल्ल्याने शरीराला अंतर्गत उष्णता आणि शक्ती मिळते.
अंजीरात कॅल्शियम आणि लोह मुबलक असते, जे हाडांना मजबूती देते.
काजूमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक असते, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि शारीरिक ताकद मिळवण्यासाठी उपयुक्त आहे
ताकद वाढवण्यासाठी खारीक किंवा बदाम दूध उकळून त्यात घालून घेतल्यास त्याचा परिणाम दुप्पट होतो