Anuradha Vipat
भावना मनात दाबून ठेवल्याने दीर्घकाळात याचे शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम होतात.
भावना बाहेर न पडल्यास विनाकारण राग येणे, सतत चिडचिड होणे किंवा नैराश्य येण्याची शक्यता वाढते.
भावना दाबल्यामुळे उच्च रक्तदाब , डोकेदुखी, पचनाच्या समस्या आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या भावना जोडीदाराला किंवा जवळच्या व्यक्तीला सांगत नाही, तेव्हा गैरसमज वाढतात.
मनात विचारांचे चक्र सतत सुरू राहिल्यामुळे शांत झोप लागत नाही, ज्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.
मनात साठलेला भावना तुम्हाला वर्तमानातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करू देत नाही, ज्यामुळे चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
भावना व्यक्त करणे हा कमकुवतपणा नसून आरोग्यासाठी आवश्यक आहे