Team Agrowon
वाढत्या खाद्यतेल आयातीमुळे केवळ आपल्या सोयाबीनचे भाव पडले नाहीत. आयात वाढल्याचा एवढा मर्यादीत परिणाम नाही तर दीर्घकाळात मोठे संकट येऊ शकतं.
सरकारचं धोरणं असचं राहीलं तर केवळ सोयाबीन उत्पादकांवरच संकट वाढणार नाही तर देशाची खाद्यतेल सुरक्षाच संकटात येईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
भारताने देशातील भाव पाडायच्या नादात सोयाबीन उत्पादकांना देशोधडीला लावलं. देशात विक्रमी आयात होऊन खाद्यतेल स्वस्त झालं.
यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले. पण सरकारच्या या निर्णयाचा फायदा झाला इंडोनेशिया आणि मलेशियातील पाम उत्पादकांना, ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादकांना, तसेच रशिया आणि युक्रेनमधील सूर्यफूल उत्पादकांना.
आपल्या सोयाबीनचे भाव मात्र ५ हजारांच्या पुढे गेलेच नाहीत. पण सरकारला याची पर्वा दिसत नाही. कारण म्हणजे ही आयात अजूनही कमी होत नाहीये.
खाद्यतेलावरील आयातशुल्क कमी केल्याने देशात विक्रमी आयात झाली. २०२२-२३ च्या तेल विपणन वर्षात म्हणजेच नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ या काळात खाद्यतेल आयात वाढून १६४ लाख टनांवर पोचली.