sandeep Shirguppe
सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात द्राक्षे आली असून स्वस्त असल्याने ग्राहक खरेदीही करीत आहेत.
मात्र काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर द्राक्षे कशी रसायनांमध्ये बुडवून टिकवून ठेवली जातात, याचे व्हिडीओ व्हायरल होतात.
द्राक्षे पिकवण्यासाठी, कीटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आणि कुजण्यापासून रोखण्यासाठी सुमारे १५ प्रकारची कीटकनाशके वापरतात.
द हेल्थ साइटच्या अहवालानुसार, द्राक्षावर वापरली जाणारी कीटकनाशके मानवी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत.
जर तुम्ही दररोज कीटकनाशके असलेली फळे खात असाल तर त्यामुळे तुमच्या घशात संसर्ग होऊ शकतो.
किटकनाशके वापरलेल्या फळांमुळे उलट्या, चक्कर येणे, डोकेदुखी. याशिवाय अशा फळांमुळे ॲलर्जीचा त्रास होऊ शकतो.
तज्ज्ञ म्हणतात, सुमारे अर्धा तास फळे पाण्यात ठेवावे, यानंतर सुती कापडाने नीट पुसून घ्या आणि नंतर खा.