Anuradha Vipat
उन्हाळ्यात मांसाहार पूर्णपणे बंद करण्याची गरज नाही, पण तो मर्यादित प्रमाणात आणि योग्य पद्धतीने करणे अत्यंत आवश्यक आहे.
मांस पचवण्यासाठी शरीराला अधिक ऊर्जा खर्च करावी लागते, ज्यामुळे शरीराचे तापमान वाढते.
प्रथिनांच्या पचन प्रक्रियेत शरीरातील पाण्याचा वापर जास्त होतो, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते.
उष्णतेमुळे मांस लवकर खराब होते. अशात साठवणूक नीट नसेल, तर अन्नातून विषबाधा होण्याचा धोका असतो.
मटण पचायला सर्वात जड असते, त्यामुळे ते टाळलेले बरे. चिकन किंवा मासे खाणे तुलनेने सुरक्षित आहे, कारण ते लवकर पचतात.
जास्त तेलकट, तिखट, मसालेदार ग्रेव्ही किंवा फ्राय केलेले पदार्थ खाणे टाळा.
मांसाहार केल्यानंतर भरपूर पाणी प्या. जेवणानंतर ताक घेतल्याने पचन सुलभ होते.