Aslam Abdul Shanedivan
राज्यासह देशात अनेक ठिकाणी उष्णतेचा कहर वाढला असून अंगाची लाही लाही होताना दिसत आहे.
त्यामुळे अशा वेळी शरीरातील थंडावा कायम ठेवण्यासाठी आपण आहारात बदल करत गुलकंद खायला हवे. याबाबत आयुर्वेदातही महत्व सांगण्यात आलं आहे
तोंड येणे, लघवीला जळजळ होणे, ॲसिडीटी, डोकेदुखी, मळमळ या समस्यांवर गुलकंदामधील व्हिटॅमिन बी उपयोगी ठरते
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांसाठी गुलकंद उपयुक्त ठरणारा असून यातील मॅग्नेशियम बद्धकोष्ठतेपासून मुक्ती देतो
मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गुलकंदामधील अँटिऑक्सिडंट गुण उपयुक्त असतात
गुलकंदामधील अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात. यामुळे रक्त शुद्ध होऊन त्वचा उजळते
हृदय निरोगी ठेवताना गुलकंदातील मॅग्नेशियम रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते