sandeep Shirguppe
चहा आणि विविध भाज्यांमध्ये विविध मसाल्यांसह आल्याला महत्व आहे. आल्यामुळे जेवनासह चहाची चव वाढते.
आल्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. आले खाल्ल्याने सर्दी-खोकला देखील कमी होतो.
मात्र सध्या कडक उन्हाळा सुरू आहे. अशा उन्हात जर तुम्ही आले खाल्लं तर आरोग्यावर याचा वाईट परिणाम होऊ शकतात.
अद्रक शरीरासाठी उष्ण असतं. यामध्ये उष्णता जास्त असल्याने शरीराचं तापमान देखील वाढतं.
तुम्हाला जास्त गरम होणे, घामोळे येणे, घाम येणे, शरीरातील पाणी पटकन कमी होणे अशा समस्या उद्भवतात.
आलं उष्ण असल्याने उन्हळ्यात अद्रकचे जास्त सेवन केल्यास शरीरातील पित्त वाढतं.
आल्याचे जास्त सेवन केल्याने एलर्जी होऊ शकते त्वचेला लाल चट्टे, खाज येणे, पुरळ येणे अशा विविध समस्या होतात.
आल्याचे जास्त सेवन केल्याने एलर्जी होऊ शकते त्वचेला लाल चट्टे, खाज येणे, पुरळ येणे अशा विविध समस्या होतात.
अद्रकचं अधिक सेवन केल्याने रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते. यामुळे चक्कर येणे आणि अस्वस्थ वाटणे अशा समस्या निर्माण होतात.