Mahesh Gaikwad
मे महिना जसाजसा जवळ येत आहे तसातसा सुर्य आग ओकायला लागला आहे. सध्या देशभर उकाड्याने लोक हैराण झाले आहेत.
या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट ठेवणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून उष्माघाताचा धोका कमी होतो.
उन्हाळ्यात जास्त करून लोक थंड पेये किंवा सरबत या सारख्या द्रव पदार्थांचे सेवन करतात.
आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या खास मिठाईबाबात सांगणार आहोत, ज्या खाऊन तुम्हाला फ्रेश वाटेल.
रस मलई ही उन्हाळ्याच्या दिवसांत मिळणारी खास मिठाई आहे. दूध आणि ड्रायफ्रूटपासून तयार होणारी रस मलई या दिवसांत खाणे चांगले असते.
या दिवसांत श्रीखंड हा गोड पदार्थही मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. अनेक सणांमध्ये जेवणात याचा समावेश असतो.
फालुदा
उन्हाळ्यात प्रत्येक आईसक्रीम पार्लरमध्ये फालुदा मिळतोच. कोल्डड्रींक पिण्यापेक्षा फालुदा खाणे कधीही फायदेशीर असते.
नारळ बर्फी
याशिवाय या दिवसांमध्ये नाराळाची बर्फी खाणे सुध्दा शरीरासाठी फायदेशीर मानले जाते.