Aslam Abdul Shanedivan
उन्हाळ्यात तापमान वाढीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची लक्षणे समोर येतात
यामुळे घाम येणे, घसा कोरडा पडण्यासह सतत तहान लागल्यासारखे वाटते
अशा वेळी शरीराची पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी काळजी घ्यावी लागते. यासाठी फळांचा वापर करू शकता.
कलिंगडमध्ये पाणी, कार्बोहायड्रेट्स, फायबर लायकोपिन, ऑक्सिडन्ट्स आणि व्हिटॅमिन ए आणि सी मुबलक प्रमाणात असल्याने शरीराला चांगला फायदा होतो.
खरबूज उन्हाळ्यात खाण्यास सर्वोत्तम फळ आहे. यात कॅरोटीन्वाईड्स, व्हिटॅमिन ए, बीसह अँटीकोआगुलंट आणि सोडियम असते.
आंब्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॉपरसोबत व्हिटॅमिन ए, सी आणि बी-६ असते. जे हृदयरोग, कर्करोग आणि अकाली वृद्धत्वावर फायदेमंद आहे
व्हिटॅमिन आणि मिनरल्सचे भांडार म्हणून स्ट्रॉबेरी ओळखली जाते. जे शरीराला ताजेतवाने ठेवून शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते.