Team Agrowon
पिकांना भर उन्हाळ्यात पाणी नसले तरी या दिवसांत लग्नसराईमुळे फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळे हार, बुके खरेदीवर अनेकांचा भर असतो.
यंदा पाण्याअभावी गुलाब दोनशे रुपये किलो; तर निशिगंध तब्बल अडीचशे ते तीनशे रुपये किलो झाला आहे. परिणामी, उन्हाळ्यात फुलांचा सुगंध महाग झाल्याचे चित्र आहे.Flower Market
यंदा दुष्काळ असल्याने फुलांची आवकही कमी असल्याचे चित्र आहे. परिणामी, फुलांच्या दरात वाढ झाली आहे.
महिनाभरापूर्वी गुलाब शंभर ते दीडशे रुपये किलो होता. आता तो दोनशे रुपये किलो झाला आहे; तर सव्वादोनशे ते अडीचशे रुपये किलो भाव असलेला निशिगंध आज अडीचशे ते तीनशे रुपये किलो आहे.
फुलांचे दर वाढल्याने बुके आणि हारांचे दरही वाढले आहे. त्यात लग्नसराई असल्याने फुलांच्या हारांची मोठी मागणी आहे.
बाजारात फुलांची आवक कमी झाल्याने हार, बुके खरेदी करताना खिशाला मोठी कात्री लागत असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्याने निशिगंध, जरबेरा, डच गुलाब ही फुले लवकर सुकतात. त्यामुळे ग्राहकांना ताज्या फुलांचे हार देण्यासाठी दररोज फुलांची गरज पडते.