Aslam Abdul Shanedivan
सध्या राज्याच्या अनेक जिल्ह्यात उष्णाता फार वाढली असून पारा ४० पार गेला आहे. यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनी आपल्या फळबागांची काळजी घेणे गरजेचे आहे
दरम्यान डॉ. आदिनाथ ताकटे यांनी उन्हाळ्यात फळबागांची काळजी घेण्याच्या काही पद्धती सांगितल्या आहेत.
डॉ. आदिनाथ ताकटे यांच्या मते सूर्यप्रकाश, उष्ण वारे, कोरडी हवा यांचा परिणाम हा फळझाडांवर होतो. यामुळे फळबागांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे.
जसे आपल्याला उन्हाळ्यात जास्त पाण्याची गरज भासते. तशीच फळझाडांना गरज असते. यासाठी ठिबक सिंचन किंवा भूमिगत सिंचन पद्धतीने फळझाडांच्या मुळांना पाणी द्यावे
तर पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात एकआड सरीने पाणी द्यावे. तसेच पुन्हा पाणी देताना दिवसातील गॅप वाढवावा.
मडका सिंचन पद्धत ही जास्त अंतरावरील फळझाडांसाठी वापरता येते. जी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते
फळझाडांचे नुकसान टाळण्यासाठी बाष्परोधकाचा वापर चांगला आहे. कारण फळझाडातील ९० टक्के पाणी हे पाणातून पर्णोत्सर्जनाद्वारे होते.