Anuradha Vipat
उन्हाळ्यात सकाळी गरम पाणी पिण्याबाबत लोकांमध्ये संभ्रम असतो.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचन संस्था सक्रिय होते आणि अन्नाचे पचन सुलभ होते.
गरम पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान किंचित वाढते, ज्यामुळे घाम येतो.
जर तुम्हाला पोट साफ न होण्याचा त्रास असेल, तर कोमट पाणी आतड्यांची हालचाल सुलभ करते आणि बद्धकोष्ठता दूर करते.
कोमट पाण्यामुळे रक्तवाहिन्या विस्तारतात, ज्यामुळे संपूर्ण शरीराला रक्ताचा पुरवठा चांगल्या प्रकारे होतो.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने चयापचय क्रिया वेगवान होते, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत होऊ शकते.
उन्हाळ्यात पित्ताचा त्रास असेल, तर गरम पाण्याऐवजी माठातील साधे पाणी पिणे अधिक हिताचे ठरते.