Mahesh Gaikwad
भारतामध्ये प्राचीन काळापासून नद्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे. भारतात नद्यांचे सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक महत्त्व आहे.
नदीच्या पाण्याचा उपयोग पिण्याशिवाय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे नदीला जीवनदायी म्हटले जाते.
भारतात छोट्या मोठ्या मिळून जवळपास २०० हून अधिक नद्या आहेत. यापैकी सर्व छोट्या नद्या प्रमुख आठ मोठ्या नद्यांना येवून मिळतात.
भारतातील बहुतांश लोकांची अपजीविका गंगा नदीवर अवलंबून आहे. गंगा ही देशातील सर्वात मोठी नदी आहे.
पण तुम्हाला भारतातील सर्वात लहान नदी कोणती? हे माहित आहे का?
आरवली पर्वतरांगातून उगम पावणारी अरवरी नदी ही भारतातील सर्वात छोटी नदी आहे. ही नदी राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातून वाहते.
या नदीची एकूण लांबी ४५ किलोमीटर असून याचे एकूण नदीपात्र ४९२ किलोमीटर वर्ग आहे. १९८५ मध्ये अरवरी नदी पूर्णपणे कोरडी पडल्याने विलुप्त झाली होती.
परंतु स्थानिकांनी या नदीवर बंधारे बांधून नदीचे संवर्धन करत तिला पुन्हा पुनरुज्जीवित केले.