sandeep Shirguppe
भारतात पूर्वी केळीच्या पानावर ठेवून आहार करण्याची पद्धत होती. सध्या भारतात फक्त श्रावण महिन्यात असे जेवन केले जाते.
दक्षिण भारतात तर अनेक ठिकाणी रोजच केळीच्या पानामध्ये जेवण्याची पद्धत आहे.
दरम्यान केळीच्या पानावर जेवल्याने अनेक लाभही मिळतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
केळीच्या पानावर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक द्रव्ये अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असते.
केळीच्या पानांवर जेवल्याने त्वचेच्या समस्येसह 'एपिगालोकेटचीन गलेट' आणि 'इजीसीजी' सारखे पॉलिफेनॉल्स 'अँटिऑक्सिडंट आढळतात.
काही अन्नपदार्थ शिजवत असताना भांड्याच्या तळाशी केळीचे पान घालण्याचीही पद्धत अनेक ठिकाणी आहे. त्यामुळे अन्नपदार्थांना एक मंद सुवास येतो.
केळीच्या पानात केलेली पानगी, इडली, मोदक आणि अन्य अनेक पदार्थ स्वादिष्टही होतात.
जेवण झाल्यावर केळीची पाने गुरांना खायला दिल्यास त्यांचे पोटही भरते आणि कचऱ्याच्या ढिगाला आळाही बसतो.