Mahesh Gaikwad
बटाटा हा भारतीयांच्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. प्रत्येक भारतीय घरामध्ये जेवणात हमखास बटाट्याचा वापर केला जातो.
कोणत्याही भाजीसोबत सहज वापरली जाणारी दुसरी भाजी म्हणजे बटाटा. बटाट्याची भाजी, पदार्थ आवडत नाही, असे खूप कमी लोक असतील.
भारतातील शेतकरी दरवर्षी जवळपास २६० लाख टन एतक्या बटाट्याचे उत्पादन घेतात. त्यातही बटाट्याचे सर्वाधित उत्पादन पश्चिम बंगालमध्ये होते.
पण प्रत्येक भाजीमध्ये दिसणारा बटाटा मूळचा भारतातील नाही, हे तुम्हाला माहित आहे का? हो हे खरं आहे. कारण बटाटा हा परदेशातून भारतात आला आहे.
५०० वर्षांपूर्वीपर्यंत भारतात बटाटा नव्हता. भारतात बटाटा आल्याचे अनेक संदर्भ आहे. इतिहासातील संदर्भानुसार, भारतात बटाटा प्रथन जहांगीरच्या काळात आला.
पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी भारतात बटाटा आणल्याचेही म्हटले जाते.
भारतात बटाट्याला प्रोत्साहन देण्याचे श्रेय वॉरेन हिस्टिंग्स यांनाही दिले जाते. १७७२ ते १७८५ या कालावधित हिस्टिंग्स भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून कार्यरत होते.
परंतु युरोपियन व्यापाऱ्यांनी भारतीयांना बटाट्याचे व्यसन लावले आणि त्याचा प्रचार प्रसारही केला.
१८ व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीला बटाट्याचा तुटवडा जाणवू लागल्याने बटाटे आयात करण्याऐवजी भारतातच उत्पादित करण्याचे ठरविले.
ईस्ट इंडिया कंपनीने शेतकऱ्यांना बटाट्याचटी रोपे दिली. त्यानंतर १८ व्या शतकापर्यंत संपूर्ण भारतात बटाटा पसरला होता.