Swarali Pawar
कांदा साठवताना योग्य काळजी घेतली नाही तर मोठं नुकसान होतं. सोप्या गोष्टी पाळल्या तर सड आणि वजन घट सहज टाळता येते.
काढणीच्या १०-१५ दिवस आधी पाणी दिल्यास कांदा मऊ पडतो. असा कांदा साठवणीत लवकर खराब होतो.
मान पूर्ण पडण्याआधी काढलेला कांदा टिकत नाही. असा कांदा साठवताना लवकर सडतो.
जास्त नत्रामुळे कांदा मऊ होतो आणि रोग वाढतात. यामुळे साठवणीत जास्त नुकसान होते.
काढणीनंतर कांदा नीट वाळवला नाही तर ओलावा राहतो. तसेच मान जास्त लहान किंवा मोठी ठेवली तर समस्या होतात. ३-४ सेमी मान ठेवून कापणे योग्य ठरते.
४ फूटांपेक्षा जास्त उंच ढिगामुळे हवा खेळती राहत नाही यामुळे खालच्या कांद्यावर दाब येऊन सड वाढते.
कांद्याच्या चाळीजवळ जनावरं बांधू नये, किंवा गोठ्याजवळ चाळ बांधू नये. शेण आणि मूत्रामुळे कांदा खराब होतो.
कांद्याच्या चाळीजवळ कधीच युरियाची साठवण करु नये. किंवा रिकाम्या चाळीतही खत साठवू नये. त्यामुळे कांद्याला पाणी सुटते आणि तो नासतो.