Aslam Abdul Shanedivan
भारतात पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांमध्ये कांद्याला अधिक महत्त्व असून कांद्याला बाजारात नेहमीच मागणी असते.
खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करतात. कांद्यामध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म देखील आढळतात.
मात्र, खराब हवामान आणि महागाईमुळे कांदा लागवडीतही शेतकऱ्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान कांदा हा नाशवंत पिक असल्याने त्याकडे शेतकऱ्यांना अधिक लक्ष द्यावे लागते. त्यासाठी त्यांना कांदा वाळवावा लागतो.
कांद्याची काढणी केल्यानंतर तो साठवणूकीच्या आधी काही मूलभूत नियमांचे पालन करावे लागते.
कांदा तयार झाला हे त्याच्यावरचे पापूद्रे वाळून पडल्यावर समोर येते. त्यावेळी ते वाळण्यासाठी एक आठवडा किंवा दहा दिवस शेतात टाकला जातो.
पण यापेक्षा अधिक जास्त दिवस शेतात टाकल्यास ते मातीतून पसरणाऱ्या रोगांना कांदा बळी ठरू शकतो. तर स्टोरेज दरम्यान बुरशी आणि कुजणे यासारखे रोग होऊ शकतात.