Anuradha Vipat
केंद्र सरकारच्या 'अॅग्री स्टॅक' डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे भारतीय शेतीत मोठी क्रांती घडून येण्याची शक्यता आहे.
अॅग्री स्टॅकमुळे शेतकऱ्यांना एकच डिजिटल ओळख क्रमांक मिळणार आहे.
अॅग्री स्टॅकमुळे शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना आणि अनुदाने थेट त्यांच्या बँक खात्यात मिळवणे सोपे होणार आहे.
अॅग्री स्टॅकमुळे प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट डिजिटल ओळख क्रमांक दिला जाईल, जो त्यांच्या आधार क्रमांकाशी आणि जमिनीच्या नोंदींशी जोडलेला असेल.
डिजिटल पीक सर्वेक्षणामुळे पिकांच्या नुकसानीचा अचूक अंदाज लावता येईल
अॅग्री स्टॅकमुळे शेतकऱ्यांना ऑनलाइन राष्ट्रीय कृषी बाजारपेठेशी जोडले जाणे सोपे होणार आहे.
अॅग्री स्टॅकमुळे भारतीय शेती डिजिटल युगात प्रवेश करणार आहे.