Anuradha Vipat
उन्हाळ्याच्या कडक उष्णतेनंतर पावसाळा सुरू होताच हवेतील ओलसरपणामुळे आपली पचनशक्ती मंदावते.
पावसाळ्यात शरीराला उबदार ठेवणारा आणि संसर्गापासून वाचवणारा आहार घेणे गरजेचे आहे.
पावसाळ्यात पचनक्रिया सुधारण्यासाठी आल्याचा चहा, तुळशीचा काढा, कोमट पाणी किंवा गरम सूप प्या.
पावसाळ्यात कच्च्या भाज्यांवर बॅक्टेरिया असू शकतात, त्यामुळे भाज्या आणि कडधान्ये नेहमी व्यवस्थित उकळून किंवा शिजवूनच खा.
पावसाळ्यात दुधी भोपळा, पडवळ, कारली आणि तोंडली यांसारख्या फळभाज्यांचा आहारात समावेश करा.
पावसाळ्यात जलजन्य आजार टाळण्यासाठी पाणी नेहमी २० मिनिटे उकळून आणि कोमट करूनच प्या.
पावसाळ्यात आहारात मूग डाळ खिचडी, ओवा, जिरं आणि हिंग यांचा वापर वाढवा.