Anuradha Vipat
वय ४० पार केल्यानंतर शरीराची चयापचय शक्ती मंदावते आणि हार्मोन्समध्ये बदल होतात.
वय ४० पार केल्यानंतर वजन वाढणे, थकवा आणि हाडांचे आजार होण्याचा धोका वाढतो.
निरोगी राहण्यासाठी वय ४० नंतर तुमच्या आहारात खालील बदल नक्की करा.
स्नायूंचे नुकसान टाळण्यासाठी अंडी, पनीर, डाळी, मोड आलेली कडधान्ये आणि चिकन खा.
हाडे मजबूत ठेवण्यासाठी दूध, दही, नाचणी आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.
हृदयाच्या आरोग्यासाठी बदाम, अक्रोड, जवस आणि ऑलिव्ह ऑईल वापरा.
गोड पदार्थ, पांढरा ब्रेड आणि बेकरी उत्पादने टाळा. ते वजन वेगाने वाढवतात.