Mahesh Gaikwad
देशभरात सेंद्रीय शेतीसह नैसर्गिक शेतीला प्रोत्सहन दिले जात आहे. अनेक शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळताना दिसत आहेत.
धैंचा हे एक हिरवळीचे खत आहे. जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी धैंचा फायदेशीर पर्याय आहे.
आज आपण सेंद्रीय शेतीमध्ये उपयुक्त असणाऱ्या धैंचा या हिरवळीच्या खताचे फायदे सांगणार आहोत.
धैंचा हे एक कडधान्य पीक असून याचा वापर जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढविण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून केला जातो.
धैंचाची लागवड करून १० टक्के रासायनिक खताचा वापर कमी प्रमाणात करू शकतो. धैंचाची उंची साधारणपणे ४ ते ५ फुटापर्यंत वाढते.
जमिनीतील बायोमास वाढविण्यासाठी धैंचाचा वापर केला जातो. यामुळे जमिनीचा सेंद्रीय कर्ब आणि उत्पादन क्षमता वाढते.
४० ते ४५ दिवसांनंतर धैंचाची जमिनीत गाडण्याची प्रक्रिया केली जाते. क्षाराचे प्रमाण जास्त असेलेल्या जमिनीत याची वाढ चांगली होते.
उभी-आडवी नांगरणी करून धैंचा जमिनीत गाडल्यास थोड्याच दिवसांत ते जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळते.
एका एकरामध्ये २०-२५ किलो बियाण्यांपासून ८-९ टन हिरवळीचे खत मिळते. पिकाची उंची जास्त असल्यास १० टनांपर्यंत खत मिळते.