Mahesh Gaikwad
अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत जेजुरीच्या खंडोबाचा सोमवती अमावस्येचा सोहळा मोठ्या थाटात साजरा झाला.
सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात. यात्रेसाठी राज्यातून लाखोंच्या संख्यने भाविक येतात.
सोमवतीनिमित्त जेजुरी गडावर सोमवतीची यात्रा भरते. भाविकांकडून गडावर भंडाऱ्याच्या मुक्तपणे उधळण केली जाते.
सोमवारी ८ एप्रिलला सोमवतीचा पालखी सोहळा पार पडला. 'यळकोट यळकोट जय मल्हार'चा जयघोष करत भाविकांनी गडावर भंडाऱ्याची उधळण केली.
सोमवतीनिमित्त जेजुरीमध्ये सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती. देवाच्या पालखी सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो.
पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरू असताना पोत्याने भंडाऱ्याची उधळण केली जात होती. भर उन्हातही खांदेकरी व मानकरी आणि भाविकांच्या गर्दीने गड फुलून गेला होता.
सायंकाळी पालखीला कऱ्हा नदीवर स्नान घालण्यात आले. कऱ्हा नदीच्या पाण्याने व दही-दुधाने खंडोबाच्या उत्सवमूर्तींना यावेळी स्नान घालण्यात आले.