Anuradha Vipat
डेंग्यू आणि मलेरियाचा ताप आल्यावर रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे ही सर्वात महत्त्वाची काळजी आहे.
डेंग्यू हा विषाणूमुळे तर मलेरिया हा प्लाझमोडियम परजीवीमुळे होतो.
डेंग्यू आणि मलेरिया या दोन्ही आजारांमध्ये रुग्णाला योग्य काळजी न मिळाल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते.
तापासाठी स्वतःहून कोणतीही गोळी घेणे टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पॅरासिटामॉल घ्या.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पहिल्या २-३ दिवसांतच डेंग्यू आणि मलेरियाची रक्त चाचणी करून घ्या
दोन्ही तापांमध्ये शरीरातील पाणी खूप कमी होते. त्यामुळे रुग्णाला सतत पाणी, ओआरएस , नारळपाणी, आणि ताज्या फळांचा रस द्यावा.
डेंग्यूमध्ये प्लेटलेट्स कमी झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने पपईच्या पानांचा रस, गुळवेलचा अर्क, आणि कीवी सारखी फळे खाऊ घालावीत.