Anuradha Vipat
शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
शरीरात पाणी कमी असल्यास रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे ऊर्जा कमी होऊन सतत थकवा जाणवतो.
पुरेशा पाण्याअभावी अन्नाचे पचन नीट होत नाही, ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास वाढतो.
त्वचा कोरडी पडते, ओठ फाटतात आणि चेहऱ्याची चमक कमी होऊन अकाली सुरकुत्या येऊ शकतात.
पाणी कमी पिल्याने लघवीचा रंग गडद होतो आणि भविष्यात मुतखडा होण्याचा धोका वाढतो.
मेंदूला मिळणाऱ्या प्राणवायूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यामुळे वारंवार डोकेदुखी किंवा चक्कर येते.
सांध्यांमध्ये असलेल्या वंगणासारख्या द्रवपदार्थात पाण्याचे प्रमाण जास्त असते. पाणी कमी पडल्यास सांधेदुखी सुरू होऊ शकते.