Anuradha Vipat
ताक आणि दही हे दोन्ही पदार्थ भारतीय आहारातील अमृत मानले जातात.
दही आणि ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे चांगले बॅक्टेरिया असतात.
ताक शरीराला थंडावा देते. ताक प्यायल्याने पोटातील जळजळ आणि अॅसिडिटी झटपट शांत होते.
दह्यामध्ये किंवा ताकात जिरेपूड आणि काळे मीठ टाकून प्यायल्याने गॅस, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो.
दुधापेक्षा दही आणि ताक पचायला खूप सोपे असते.
दही नेहमी सकाळी किंवा दुपारी जेवताना खावे.
रात्रीच्या वेळी दही कधीही खाऊ नये. यामुळे कफ वाढतो आणि सांधेदुखी किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो.