Team Agrowon
पावसाच्या पाण्यावर येणारं आपत्कालीन पीक म्हणून चवळी हे पीक ओळखल जातं. कडधान्य, भाजी, चारापीक आणि हिरवळीचे पीक म्हणूनही चवळीची लागवड केली जाते.
जून, जुलै, ऑगस्ट,सप्टेंबर या दरम्यान केव्हाही पेरणी योग्य पावसानंतर चवळीची पेरणी करता येते.
चवळी हे पीक कमी कालावधीचे असल्यामुळे दीर्घ मुदतीच्या पिकात मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून बरेच शेतकरी चवळी पीक घेतात.
चवळी लागवडीसाठी मध्यम ते भारी,पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी योग्य पाऊस होताच वाफसा आल्यानंतर पेरणी करावी.
पेरणी ४५ सेंटीमीटर बाय १० सेंटीमीटर अंतरावर करावी. पेरणीसाठी हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागत.
पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्याला ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम कार्बेन्डाझिमची बीजप्रक्रिया करावी. त्यानंतर प्रति किलो बियाणाला २५ ग्रॅम रायझोबियम आणि पीएसबी जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
चवळी वाण आणि हंगामानूसार ६ ते ८ आठवड्यात तोडणीस तयार होते. चवळीचे हेक्टरी ५ ते ८ टनांपर्यंत हिरव्या शेंगाचे उत्पादन मिळते.