Swapnil Shinde
दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीट यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे पिकांचे मोठे नुकसान होते. यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु करण्यात आली.
पूर्वी या शेतकऱ्यांना खरीप व रबी हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या अनुक्रमे २ टक्के व १.५ टक्के हफ्ता शेतकऱ्यांना भरावा लागायचा. तर नगदी पिकासाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के हफ्ता भरावा लाग होता.
राज्य राज्य शासनाने यंदापासून शेतकऱ्यांसाठी 1 रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे.
खरीप हंगाम संपून रब्बी हंगामाला सुरुवात झाला असून या हंगामातील पिकांसाठी विमा संरक्षित करण्याचे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यातच आले आहे.
रब्बी हंगाम 2023-24 मध्ये गहू (बागायत), हरभरा, रब्बी कांदा आदी पिकांसाठी पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ डिसेंबर २०२३ आहे.
उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०२४ अशी आहे. त्यासाठी पीएमएफबीवाय (PMFBY) ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे .
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणीसाठी सामूहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रुपये ४० देण्यात येते.