Water Stress on Crops: पाऊस नाही, पीक वाळतंय? पिके वाचवण्यासाठी करा हे ५ सोपे उपाय!

Swarali Pawar

काळजी करू नका!

पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन, कपाशी आणि तुरीवर पाण्याचा ताण येत आहे. अशा वेळी काही सोपे उपाय करून पिकांना तग धरून ठेवता येते.

Crop Care | Agrowon

संरक्षित सिंचन

पीक वाळताना दिसत असेल तर शक्य असल्यास तातडीने संरक्षित सिंचन द्या. पाणी उपलब्ध नसेल तर पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खतांची फवारणी करता येते.

Crop Care | Agrowon

पालाशयुक्त खतांची फवारणी

सोयाबीन आणि तुरीसाठी १३:०:४५ची १० ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करा. सोयाबीन शेंगा भरण्यात आणि कपाशी बोंडांच्या अवस्थेत असल्यास ०:०:५०चा वापर करा.

Crop Care | Agrowon

केओलिनचा थर

सोयाबीन, कपाशी आणि तुरीवर ६ टक्के केओलिन म्हणजे ६० ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारता येते. यामुळे पानांवर पांढरा थर तयार होऊन बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते.

Crop Care | Agrowon

पाण्याच्या ताणात मदत

पालाशामुळे पानांवरील छिद्रांची उघडझाप नियंत्रित होण्यास मदत होते. त्यामुळे पिकातून पाण्याची वाफ कमी होऊन पीक कमी पाण्यात तग धरू शकते.

Crop Care | Agrowon

आंतरमशागत करा

कपाशी आणि तुरीमध्ये कोळपणी करून जमिनीवरील भेगा बुजवा. यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास आणि मुळांना हवा मिळण्यास मदत होते.

Crop Care | Agrowon

पाणी जमिनीत मुरवा

जास्त अंतराच्या ओळीतील पिकांमध्ये सऱ्या पाडून पावसाचे पाणी जमिनीत मुरवा. परतीच्या पावसाचा प्रत्येक थेंब साठवून ठेवणे पिकांसाठी फायदेशीर ठरते.

Crop Care | Agrowon

आच्छादन करा, ओलावा टिकवा!

पिकाच्या ओळींमध्ये आच्छादन केल्यास जमिनीतील ओलावा जास्त काळ टिकतो. यासोबत तणांची वाढही कमी होते आणि पिकाला पाण्याच्या ताणापासून संरक्षण मिळते.

Crop Care | Agrowon

Moong Harvest: मूग-उडीद काढणीची वेळ आली! दाणे खराब होऊ नयेत म्हणून ही काळजी घ्या

Agrowon
अधिक माहितीसाठी...