Aslam Abdul Shanedivan
राज्यात हवामान बदलामुळे सध्या अनेक आजार डोके वर काढत आहेत. वाढत्या उन्हाचा तडाखा आणि अवकाळी राज्यात सुरू आहे
अचानक हवामानातील बदलामुळे कोरडा खोकला आणि सर्दी सारख्या समस्या उद्भवतात.
सतत थंड पाण्याच्या सेवनामुळे श्वसनमार्गामध्ये जळजळ होते ज्यामुळे खोकला होतो.
फ्लू सारख्या विषाणूच्या संसर्गामुळे कोरडा खोकला आणि सर्दी होते
यामुळे शरीराची प्रतिकारशक्तीही कमी होते. अशावेळी कोरड्या खोकल्या पासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय करता येतात
मधाचे सेवन केल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. फक्त यात काही पदार्थ मिसळून त्याचे सेवन करावे
कोरड्या खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मधात आले मिसळून खाणे खूप फायदेशीर ठरते.
लवंगमधील दाहक-विरोधी गुणधर्म आणि काळी मिरीतील पेपरिन गुणांमुळे कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो. लवंग किंवा काळी मिरी मधामध्ये मिसळून सेवन करावे