Anuradha Vipat
दैनंदिन जीवनातील धावपळीत आपण अशा काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, ज्या हळूहळू आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.
सलग तासनतास बसून राहिल्याने रक्ताभिसरण मंदावते आणि हृदयविकार, मधुमेह तसेच लठ्ठपणाचा धोका वाढतो.
जेवताना किंवा जेवल्याबरोबर लगेच जास्त पाणी पिल्याने पाचक रस पातळ होतात.
मोबाईलमधून निघणारा 'ब्लू लाईट' झोपेच्या संप्रेरकांवर परिणाम करतो, ज्यामुळे निद्रानाश वाढतो.
कामाच्या गडबडीत नाश्ता न केल्याने शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते आणि दुपारच्या वेळी जास्त खाण्याची इच्छा होते.
दिवसातून ७-८ तास शांत झोप न मिळाल्यास प्रतिकारशक्ती कमी होते.
अन्नात वरून मीठ घेणे किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो